शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीचा सूर : सांगलीत पहिली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:16 IST

महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पहिल्या बैठकीला अखेर शुक्रवारी मुहूर्त मिळाला. वसंत बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत आघाडीबाबत बैठक झाली. यावेळी

ठळक मुद्देकाँग्रेसकडून ४३-३३ चा फॉर्म्युला महापालिका निवडणूक

 सांगली : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पहिल्या बैठकीला अखेर शुक्रवारी मुहूर्त मिळाला. वसंत बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत आघाडीबाबत बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने निम्म्या म्हणजे ३९ जागांची मागणी केली. पण काँग्रेसने निम्म्या जागा देण्याबाबत राष्ट्रवादीला नकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. सध्या दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून आता वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू होणार आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार असल्याची चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. पण प्रत्यक्षात आघाडीबाबत दोन्ही पक्षांची एकत्रित बैठक झालेली नव्हती. यापूर्वी जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीतच प्रामुख्याने लढती होत. पण लोकसभा ते जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत जिल्ह्यात भाजप एक नंबरचा पक्ष बनला आहे. भाजपचा विजयी रथ महापालिका निवडणुकीत रोखण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी हात पुढे केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगली-मिरजेतील पक्षीय बैठकांतून आघाडीचे संकेत दिले होते. माळ बंगला येथे सत्तर एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील एकत्र आले होते. त्यावेळी आ. जयंत पाटील व खा. चव्हाण यांनी आघाडीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. गुरूवारी सांगलीवाडीतील कार्यक्रमात देखील जयंत पाटील यांनी आघाडीबाबत जयश्रीताई पाटील यांच्याशी चर्चा केली.

त्यानंतर शुक्रवारी काँग्रेस-राष्ट्रवादीची प्राथमिक बैठक कॉंग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या विजय बंगल्यावर पार पडल्याचे वृत्त आहे. या बैठकीला काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील, गटनेते किशोर जामदार, स्थायी समितीचे माजी सभापती संतोष पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील उपस्थित होते. आघाडीच्या चर्चेवेळी राष्ट्रवादीने काँग्रेससमोर ३९-३९ जागांचा प्रस्ताव ठेवला. निवडणुकीच्या तोंडावर अनेकजण राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी निम्म्या जागांचा प्रस्ताव काँग्रेसला देण्यात आला. पण महापालिका क्षेत्रात काँग्रेसची ताकद मोठी आहे. त्यात आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निम्म्या जागांच्या प्रस्तावाला नकार देण्यात आला. काँग्रेसने ४३-३३ जागांचा फॉर्म्युला राष्ट्रवादीला दिला आहे.

आघाडीबाबत पहिलीच बैठक असल्याने दोन्ही बाजूंनी फार ताणाताणी करण्यात आली नाही. जागा वाटप व आघाडीचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत. काही जागांवर पेच निर्माण होणार असल्याने यावर देखील चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात प्राथमिक चर्चा झाल्याचे वृत्त आहे. महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरच आघाडीबाबतच्या बैठका व जागावाटपाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे एका पदाधिकाºयाने सांगितले.दहा जागांवर पेचआघाडीच्या पहिल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यात दोन्ही पक्षांकडे दहा जागांवर मातब्बर उमेदवार असल्याने या जागांचा तिढा कसा सोडावायचा, यावरही प्राथमिक चर्चा करण्यात आली. त्यात सांगलीवाडीतून काँग्रेसकडून दिलीप पाटील, राष्ट्रवादीतून हरिदास पाटील इच्छुक आहे. धनपाल खोत यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने कुपवाड प्रभाग एकमध्ये विद्यमान नगरसेवक प्रशांत पाटील यांच्या उमेदवारीचे काय करायचे?, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मिरजेतून माजी महापौर इद्रिस नायकवडी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. ते राष्ट्रवादीत आल्यास त्यांनाही काही जागा सोडाव्या लागतील. विशेषत: प्रभाग पाचमधील काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांचे पुत्र करण यांच्याविरोधात नायकवडींनी लढाईची तयारी चालविली आहे. अशा आठ ते दहा जागांचा गुंता भविष्यातही वाढणार आहे. 

पुढील आठवड्यात आचारसंहिता?महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची उत्सुकता साºयांनाच लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आचारसंहिेतेबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही प्रभागात बैठका, सभा घेत वातावरण तापविण्यास सुरूवात केली आहे. पक्षपवेशासाठीही इच्छुक मंडळी राजकीय पक्षांकडे पाठपुरावा करताना नेत्यांच्या मागे-पुढे मिरवताना दिसत आहेत. पण आचारसंहिता लांबणीवर जात असल्याने वेगवेगळ्या अफवांनाही ऊत आला आहे. निवडणुका लांबणीवर जाणार असल्याची अफवाही पसरली आहे. त्यात महापालिका प्रशासनाने मात्र आपल्या पातळीवर निवडणुकीची तयारी चालविली आहे. सोमवारी राज्य निवडणूक आयोगाकडून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे सोमवारनंतर केव्हाही आचारसंहिता लागू होईल, असे प्रशासनाचे मत आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणElectionनिवडणूक